श्रीरामपूर । झुंजार न्यूज

गेल्या १३ वर्षापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून भाजपाचे मैत्री संबंध रामदास आठवले यांच्यासह कार्यकर्त्यानी जपले मात्र त्या प्रमाणात रिपाई कार्यकर्त्याना जिल्ह्यात सन्मान मिळाला नाही . सत्तेच्या समीकरणात सत्तेचा वाटा मिळाला नसल्याने कार्यकर्त्यामध्ये मोठी नाराजी असल्याची भावना रिपाई राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांनी व्यक्त केली .
 २०२४ लोकसभेचे पडघम वाजू लागले मित्र पक्ष भाजपाने आपली उमेदवारी यादी जाहीर केली मात्र रामदास आठवले यांच्याकरिता शिर्डीची जागा मागून ही यावर गांभिर्याने विचार होत नसल्याने जिल्हातील रिपाई पक्षाच्या कार्यकर्त्यानी तातडीची नियोजन बैठक श्रीरामपूर मध्ये घेत कार्यकर्त्याची मते जाणून घेतली . यात रामदास आठवले यांनी जिल्ह्यातील सहकार नेत्यासाठी खूप काम केले असून त्यांची उमेदवारी बाबत भूमिका काय आहे ?  ते रामदास आठवले यांच्या करिता आग्रही आहे का ? , आठवले यांनी निवडणुक लढवावी हे फक्त समाज अथवा कार्यकर्त्यानी आग्रही राहावयाचे का ? , मित्रपक्ष आपलेला खरोखर मदत करतात का ? केवळ शब्द तर देत नाही , निवडणुकीचा उमेदवार त्यांच्या सांगण्या वरुन व इशाऱ्यावरुन होते मग स्पष्टपणा ते दाखवत नाही असे एका ना अनेक प्रश्न उपस्थित करत कार्यकर्त्यानी आपल्या भूमिका मांडल्या .
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी रिपाई राज्य सचिव राजाभाऊ कापसे हे होते तर जि प माजी सदस्य दिपकराव गायकवाड , विभागीय प्रमुख भिमा बागुल , युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे , रमेश शिरकांडे , सुभाष त्रिभुवन , आशिष शेळके , सुनिल शिरसाठ , अनिल नन्नवरे , कैलास कासार , बाळासाहेब कदम , अमोल राखपसरे , आंबा नन्नवरे , राजू मगर , स्नेहलताई सांगळे , रमाताई धिवर , ताबोळी , आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते .

 

यावेळी विजयराव वाकचौरे पुढे म्हणाले की , रामदास  आठवले यांना लोकामधून निवडून जाण्याची आवड असल्यानेचं शिर्डी हे त्यांच्या चळवळीपासून त्यांचे लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध आहे हा मतदार संघ फार मोठा आहे २००९ मध्ये सहकार सम्राटांकडून दगाफटका झाला होता . आता सावध भूमिका घ्यावी  लागेल जोपर्यत उमेदवारी जाहीर करत नाही तो पर्यत कोणत्याही नेत्याशी संपर्क ठेवायचा नाही , वाड्यावर जायचे नाही . आपले हितशत्रू जास्त आहे त्यांच्या पासून सावध रहा . अपप्रचार होणार आहे मात्र नाक दाबल्याशिवाय तोंड उघउत नाही , या म्हणी नुसार आठवले यांना उमेदवारी न मिळाल्यास भाजपाच्या उमेदवाराकरिता दरवाजे बंद करु तर दक्षिणेकडे लक्ष्य केद्रींत करु .

राजाभाऊ कापसे म्हणाले की , रिपाई पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून रामदास आठवले यांचे  टेटस् कार्यकर्त्यान  मोबाईलवरती ठेवन प्रचारास सुरुवात करा टेटस् बघून यांच्या झोपा उडाल्या पाहिजेल व उमेदवारी बाबत विचार झाला पाहिजेल 

दिपक गायकवाड म्हणाले की , भाजपा हा आपला मित्र पक्ष आहे . मात्र त्यांची भूमिका रास्त आहे की नाही माहित नाही रिपाई राष्ट्रीय पक्ष असून उमेदवारी न मिळाल्यास वेगळा विचार करावा लागेल . आपण चळवळीतील कार्यकर्ते आहोत . सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा सत्तेचा वाटा मिळाला पाहिजेल  .
भिमा बागुल म्हणाले की , नेत्याचे आदेश मानणे कार्यकर्ते आठवले यांचा मोठा संघर्ष त्याग आहे २ ००९ नंतर पुन्हा संधी सर्व ताकदीने आवाज उठवा आमच्या नेत्याला उमेदवारी द्यावी एकजुठीनी काम करायचे आहे .  
रमाबाई धिवर म्हणाले की , रामदास आठवले आल्यानंतर कार्यकर्त्यामध्ये उर्जा निर्माण होते आठवले च्या उमेदवारी बददल वाड्या वर जावून हट्ट धरु ! जिल्हयालेला रामदास आठवले यांची गरज आहे  
प्रास्ताविक सुनिल शिरसाठ यांनी केले .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *