पक्षात कार्यकर्त्याचा संच मोठा आहे मात्र केवळ फोटो काढून पक्ष मजबूत होत नाही तर गावा – गावात , तळागाळात संघटन महत्वाचे असून तरचं निवडणुकांमध्ये यश मिळेल ।                                                                                                        सामाजिक न्याय विभागातून वयोश्री सारख्या अनेक योजना राबविल्या तर शिर्डी उदयोगाला चालना देणार !                                                                               संगमनेर : झुंजार न्यूज                                                                                                                                                                                                                             शिर्डी लोकसभेत माझा अप्रचार करुन २००९ ला माझा पराभव केला मात्र राजकारणात हार – जीत ही चालू राहते यातून मी काय नरोस झालो नाही मात्र शिर्डी व परिसरातील लोकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध असून शिर्डी सर्वागींण विकासाकरिता लोकांच्या आग्रहा खातर मी पुन्हा २०२४ ला शिर्डीमधून निवडणुक लढविणार असल्याचे मत केद्रींय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना . रामदास आठवले यांनी व्यक्त केले .
                                                                                               केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले हे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकारिणी बैठकी प्रसंगी शिर्डी येथे आले होते . याप्रसंगी विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ना आठवले बोलत होते या प्रसंगी माजी मंत्री अविनाश महातेकर , प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे , राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे , केंद्रीय उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड , जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव , दिपकराव गायकवाड , दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे , उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात , भिमा बागुल , पप्पू बनसोडे , रमेश मकासरे , सुनिल मोरे , चांगदेव जगताप , राजाभाऊ कापसे , आशिष शेळके , गणेश गायकवाड , राजेंद्र गवांदे , रमेश शिरकाडे , राजेंद्र वाघमारे आदी उपस्थित होते .
                                                                                                                          ना रामदास आठवले पुढे म्हणाले की , राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेतून काहीचं साध्य होणार नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दमदार नेते असून त्यांनी गोरगरिब माणसाकरिता विविध योजना काढल्या , राबविल्या . त्यातून मोठे परिवर्तन होत असल्याने संपूर्ण देशात भाजपाच्या शिर्डीसह ३५० ते ४०० जागा निवडून येतील बाळासाहेब विखेशी माझे चांगले संबंध असल्याने त्यामुळे २००९ ला मी शिर्डी व त्यांनी नगरमधून निवडणुक लढविण्याचे ठरविले मात्र राष्ट्रवादी पक्षाने जागेच्या आदला – बदलीस नकार दिल्याने त्यांची इच्छा अपुरी राहिली मात्र पवार हट्टामुळे त्यावेळेस दोन्ही जागा पडल्या . राजकारणात जय पराजय चालूचं राहतो आता पुन्हा संधी मिळाल्यास शिर्डीकरासाठी मी पुन्हा येईल आता मात्र विजय निश्चित राहिली या करिता पंतप्रधान नरेद्र मोदी , अमित शहा , जी पी नड्डा , एकनाथ शिंदे ,देवेंद्र फडणवीस , राधाकृष्ण विखेशी चर्चा करणार आहे .
                                           राज्यात सत्ते वाटा मिळावा म्हणून देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाली आहे . किमान एक मंत्री पद , विधान परिषद , महामंडळे मिळावी असा आग्रह आहे सामाजिक न्याय विभागातून सर्वात जास्त निधीचा उपयोग केला आहे . त्यामुळे शिर्डीमध्ये उदयोगाला चालना देणार असून यांचा तरुणांना फायदा होणार आहे तर प्रकाश आंबेडकरांबरोबर मी काम करण्यास तयार आहे मात्र ते नाहीत उध्दव ठाकरे व प्रकाश आंबेडकराची जरी युती झाली यांचा मात्र जास्त फायदा होणार नाही . उध्दव ठाकरे यांना आपला संभाळता आला नाही बाळासाहेबांच्या विचाराशी न राहील्यामुळे आमदार सुद्धा निघून गेले हे दुर्दव असून ज्याच्याशी बाळासाहेब विचाराने विरोध राहिले त्याच्याचं मांडीला मांडी लावून बसले त्यामुळे पक्षाला ग्रहण लागले आता खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची असल्याने मुंबई महानगरपालिकेत भाजपा ची सत्ता येणार आहे व रिपब्लिकन पक्षाला ही यांचा मोठा फायदा होणार वंचित आता वंचितचं राहणार आहे                                                                                                 .                        आम्ही तिघे एकत्र असल्यावर मनसेचे काय ? काम आहे राज ठाकरे हे चांगले वक्ते आहे मात्र राष्ट्रीय राजकारणात मनसे कुठलाही फायदा होणार नाही . शरदराव पवारा यांनी राष्ट्रीय राजकारणात भाजपाला साथ दिल्यास त्यांचे स्वागतचं राहिल .                                                                                                            चौकट : नागालँडमध्ये आठ जागा लढविल्या होत्या पैकी दोन आमदार निवडून आले . त्याचं धरर्तीवर राज्यात पक्ष बळकट करुन निवडणुका लढविणार आहे पक्षात कार्यकर्त्याचा संच मोठा आहे मात्र केवळ फोटो काढून पक्ष मजबूत होत नाही तर गावागावात , तळागाळात संघटन महत्वाचे असून तरचं निवडणुकांमध्ये यश मिळेल असे रामदास आठवले यांनी आवाहन केले
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *