{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

राहुरी । झुंझार न्यूज

अहिल्यानगर (नगर) जिल्ह्यातील रस्ते आणि विकासकामांबाबत सध्या मोठी चर्चा सुरू असतानाच, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नगर-मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. “नगर-मनमाड महामार्गाच्या कामात सध्या दिरंगाई होत असून, याला जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेला डांबराचा तुटवडा कारणीभूत आहे,” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

राहुरी येथे आयोजित एका कार्यक्रमात पत्रकारांशी आणि नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी ही वस्तुस्थिती मांडली. यावेळी त्यांनी विरोधकांकडून होणारी टीका आणि सोशल मीडियावरील आंदोलनांवरही भाष्य केले.

४० हजार कोटींची विकासकामे, पण महामार्गाचा प्रश्न कायम

डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, “गेल्या काही वर्षांत आपण जिल्ह्यात तब्बल ४० हजार कोटी रुपयांची विविध विकासकामे यशस्वीपणे मार्गी लावली आहेत. मात्र, नगर-मनमाड महामार्गाच्या कामात सध्या अडथळे येत आहेत, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. या महामार्गाची दुरवस्था आणि कामाचा संथ वेग यामुळे नागरिकांना होणारा त्रास मला मान्य आहे.

युद्धजन्य परिस्थितीचा फटका

महामार्गाच्या कामात होत असलेल्या विलंबाचे तांत्रिक कारण स्पष्ट करताना विखे पाटील म्हणाले की, “सध्या जगात अनेक ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय व्यापारावर आणि कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर झाला आहे. रस्ते बांधणीसाठी लागणाऱ्या डांबराचा (Bitumen) सध्या मोठा तुटवडा निर्माण झाला असून, केवळ नगरमध्येच नाही तर अनेक मोठ्या प्रकल्पांवर याचा परिणाम झाला आहे. डांबर उपलब्ध नसल्याने कामाचा वेग मंदावला आहे.


रस्त्याच्या कामावरून सोशल मीडियावर होणारी टीका आणि विविध संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनांवर बोलताना त्यांनी खडेबोल सुनावले. “महामार्गाच्या कामाबाबत केवळ आंदोलन करणे किंवा सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करणे हा यावरचा खरा उपाय नाही. परिस्थिती तांत्रिक आहे आणि प्रशासकीय पातळीवर ती सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा वेळी केवळ राजकारण करण्यापेक्षा वस्तुस्थिती समजून घेणे आवश्यक आहे,” असे विखे यांनी स्पष्ट केले.

नगर-मनमाड रस्ता हा जिल्ह्याची जीवनवाहिनी असून त्याचे काम पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मात्र, सध्याची अडचण पाहता नागरिक आणि कार्यकर्त्यांनी काही काळ संयम ठेवावा, असे आवाहन डॉ. सुजय विखे पाटील यांनी यावेळी केले. हा अडथळा तात्पुरता असून, डांबराचा पुरवठा सुरळीत होताच कामाला पुन्हा पूर्ण क्षमतेने गती दिली जाईल, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *