मुंबई l झुंजार न्यूज
महापरिनिर्वाण दिवस हा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन म्हणून पाळला जातो. ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यामुळे दरवर्षी ६ डिसेंबरला जगातून, तसेच देशभरातून मोठ्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर एकत्र येत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय जाति व्यवस्थेतील हरिजन समाजाच्या सुधारणेसाठी भरीव काम केले. अस्पृश्यतेची प्रथा संपविण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. डॉ. बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा अभ्यास करून, भगवान गौतम बुद्धांची शिकवण तळागाळातील सर्व लोकांपर्यंत पोहोचवली. त्यांनी मागास समाजाला शिक्षणाचा हक्क मिळवून दिला.

अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातूनही एकमेकांना संदेश पाठवून या महापुरुषाच्या स्मृतीस उजाळा देतात,

१) राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव,
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना
विनम्र अभिवादन…!२) आचार-विचारांत भरली राष्ट्रनिष्ठा, लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रयत्नांची केली पराकाष्ठा
त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस महापरिनिर्वाणदिनी विनम्र अभिवादन!३) देशात एकता, समता, बंधुता नांदावी
म्हणून आयुष्यभर झटणाऱ्या महामानवाला
महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम!!४) विश्वरत्न, भारतरत्न, प्रज्ञासूत्र, क्रांतिसूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, परमपूज्य, बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन!
५) एक उत्तम कलाप्रेमी, शिक्षणप्रेमी,
गुणवंत, बुद्धिमान असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम…!

१) तुमच्याकडे २ रुपये असतील,
तर १ रुपयाची भाकरी घ्या,
आणि १ रुपयाचे पुस्तक.. ” भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल, तर पुस्तक ‘जगावे कसे’ हे शिकवेल.. “२) स्वातंत्र्य विचारसरणीचं, स्वातंत्र्य वृत्तीचं निर्भय नागरिक व्हा !३) अपयश कधीच अंतिम नसते
तुमचे प्रयत्न तोपर्यंत सुरू ठेवा
जोपर्यंत तुमचा विजय इतिहास बनत नाही४) बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष्य असले पाहिजे.
५) बोलताना विचार करा
बोलून विचार करू नका.

