संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या अध्यक्षपदी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) संगमनेर तालुका अध्यक्ष आशिष प्रभाकर शेळके यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे समितीच्या कार्याला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
याप्रसंगी ऍड. रवींद्र शेळके, रविंद्र बाजीराव शेळके, अशोक शेळके, राजू शेळके, गुलाब शेळके, अनिल शेळके (पत्रकार), विजय शेळके, संदीप रोकडे, डॅनियल गायकवाड, विनायक शेळके, रोहित शेळके, प्रतीक शेळके, सौरभ शेळके, संग्राम शेळके, पंकज शेळके, बाबासाहेब शेळके, सनी शेळके, सनी लोंढे, सोनू शेळके, फिलिप शेळके, अविनाश शेळके, अनिल बर्डे, दादू बर्डे, जॉनी शेळके, पोपट शेळके, सचिन शेळके, ऋतिक शेळके, सागर शेळके यांच्यासह मोठ्या संख्येने मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
या निवडीबद्दल आशिष शेळके यांचे सर्व उपस्थितांनी अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार आणि स्मारकाची देखभाल व विकास या कामांमध्ये ही समिती सक्रिय आहे.
उंबरी बाळापूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक होणार असून या स्मारकाचे काम तातडीने करण्यात येवून यांचे उट्रघाटन केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले , पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत होईल