मुंबई । झुंजार न्यूज

 

‘महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागा लढविण्याची वल्गना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी करता कामा नये. आंबेडकर यांनी आपल्या सोबत येण्याची भूमिका घ्यावी. तसे झाल्यास प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले या दोघांची एकत्रित ताकद महाराष्ट्राच्या राजकीय क्षितीजावर वेगळा पर्याय देऊ शकते. मात्र, आपल्यासोबत येण्याचे धाडस ते का करीत नाहीत, हे मोठे कोडे आहे,’ असे वक्तव्य रिपब्लिकन पक्षाचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी केले.

 

विरोधकांची ‘इंडिया’ अलायन्स असो अथवा अन्य प्रादेशिक पक्षांनी केलेले प्रयत्न, तरीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. आगामी लोकसभा निवडणुकीचे वातावरण पाहता भाजपप्रणित ‘रालोआ’ ही सर्वसामान्य जनतेची पसंती दिसत असल्याचे भाकित आठवले यांनी यावेळी केले.

दरम्यान, तृतीयपंथींकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाने बदलला पाहिजे; तृतीयपंथीसुद्धा माणूस आहे. त्यांना सुद्धा अन्न वस्त्र निवाऱ्याचा अधिकार आहे. तृतीयपंथींसाठी काही घरे राखीव ठेवण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed