आश्वी । झुंजार न्यूज
” आपल्या नेत्यावर विरोधकांकडून झालेल्या आरोपाचे उत्तर देण्यापेक्षा त्यांनी जेवढे आरोप केले तेवढ्ये डोल प्रकरण , रेशन कार्ड व गोर – गरिबांना धान्य मिळवून देण्यासाठी जो कार्यकर्ता काम करेल तो सच्या कार्यकर्ता होय ” हा कानमंत्र देत डॉ सुजय विखे पाटील म्हणाले की , आम्हाला घर बसणारा कार्यकर्तो नको तर माणसांच्या कल्याणकारी धोरण ठेवणारा कार्यकर्ता हवा बाळासाहेब विखे यांची आरोपाला – प्रतिआरोप करण्यापेक्षा गोर गरिबांच्या कल्याणकारी कामे करण्याची संस्कृती असल्यानेच स्व:खर्चातून सामाजिक कार्य करण्याचे धोरण असल्याचे मत खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले .



यावेळी डॉ विखे पाटील पुढे म्हणाले की , दीड दोन वर्षांपूर्वी आलेल्या महायुती सरकारच्या माध्यमातून आपण प्रामाणिक आणि नैतिकतेने तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात कामाचा सपाटा सुरू केला आहे. आजपर्यंत जिल्हा नियोजन विभागाच्या माध्यमातून 500 बचत गटांना स्वयंरोजगारासाठी विविध साहित्यांची उपलब्धता करून देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून महिलांना सक्षम करण्यासाठी अनेक उपक्रम आज जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत व सदरील उपक्रमांच्या अंतर्गत विविध बचत गटांच्या माध्यमातून प्रत्यक्षात कामे देखील चालू आहेत. यातून अनेक रोजगाराच्या संधी महिलांना उपलब्ध होत आहेत याचे विशेष समाधान वाटते .



चौकट
रामायणात मथंरा मुळे रामाला वनवास भोगावा लागला अशा अनेक मथंरा आपल्या २६ गाव परिसरात असून ज्यांना घरात , समाज्यात किंमत नाही अशा मथंरा पासून महीलानी सावध रहा या मथंरा आपल्या परिवारासाठी , समाज्याच्या , गोर गरिबांच्या विकासासाठी घातक आहे या मथंरा कोणाच्याचं नसतात त्याचे कामचं आहे रात्रीच्या सुविधा करिता बोट लावा – लावी करणे हेचं होय
