{"remix_data":[],"source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

शिर्डी । झुंजार न्यूज

शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा तसा कॉग्रेसचा बाल्लेकिल्ला या मतदारसंघातून ९ वेळेस कै आदरणीय बाळासाहेब विखे पाटील यांचे वर्चस्व राहिले मात्र 2009 ला आरक्षण लागल्यापासून या मतदारसंघातून चमत्कार घडत गेले अपेक्षापेक्षा वेगळे चित्र निर्माण होवू लागल्याने लोकसभेच्या निवडणुकीत मतदार राजा हा ना विखे ना थोरात कोणाचे ऐकत नाही मग वाकचौरे , लोखंडे यांचे काय ? रुपवतेचं बाजी मारणार हे मतदारांच्या चर्चातून दिसत आहे .

महाराष्ट्रातील शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा राज्यातील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. हा मतदार संघ अहमदनगर जिल्ह्यात येतो आणि जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघांचा त्यात समावेश होतो. त्यात अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर आणि नेवासा मतदारसंघांचा समावेश आहे. शिर्डीत साईबाबांचे मोठे मंदिर आहे. या भागाला साईनगर ( शिर्डी ) असेही म्हणतात. येथे हिंदू-मुस्लिमसह सर्व धर्माचे भाविक येतात.  शिर्डी लोकसभा मतदारसंघातील संगमनेर परिसर कपडे, दागिने आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या बाजारपेठेसाठी खूप प्रसिद्ध आहे. हे शहर दूध उत्पादनाचेही मोठे केंद्र आहे. तसेचं कोपरगावला शुक्राचार्यांची भूमी म्हणतात. या ठिकाणी भृगु ऋषींचे पुत्र आणि दानवांचे गुरु शुक्राचार्य यांना भगवान शंकराकडून मृत्युसंजीवनी मंत्राचे ज्ञान प्राप्त झाले होते असे मानले जाते. येथे प्राचीन कचेश्वर मंदिरही येथे आहे. तर श्रीरामपूर , नेवासा , अकोले या तालुक्यांना सुध्दा इतिहास असून क्रांती घडविणारे तालुके आहेत .

शिर्डी लोकसभेची पहिली आरक्षित निवडणूक 2009 मध्ये  झाली. शिवसेनेने या जागेवर आपला विजय नोंदवला आणि कायम राखला. या मतदार संघावर अनुसूचित जातीसाठी आरक्षण आहे. 2019 च्या जनसंख्येप्रमाणे या जागेवर 1,587,079 मतदार होते. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 8,241,74, तर महिला मतदारांची संख्या 7,628,32 आहे.

शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे यांनी 2009 मध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तर त्यांच्यासमोर आरपीआय (ए)चे रामदास आठवले होते. या निवडणुकीत सर्वाधिक 12 अपक्ष उमेदवार उभे होते. निवडणुकीच्या निकालात शिवसेनेच्या वाकचौरे यांना 3,59,921 मते मिळाली. त्यांनी ही निवडणूक 1,32,751 मतांनी जिंकली. रामदास आठवले यांना 2,27,170 मते मिळाली. येथे पहिला चमत्कार घडला विखे , थोरात , काळे – कोल्हे , गडाख , ससाणे , मुरकुटे , पिचड आदी मातब्बर व सहकार सम्राट बरोबर असताना सुध्दा मतदारांनी चमत्कार घडविला .

2014 च्या निवडणुकीतही शिवसेनेने या जागेवर विजय मिळवला होता. शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांना तिकीट दिले होते. त्यांना 5,32,936 मते मिळाली. त्यांच्यासमोर काँग्रेसचे भाऊसाहेब राजाराम वाकचौरे होते. त्यांना 3,33,014 मते मिळाली आणि 1,99,922 मतांनी त्यांचा पराभव झाला. 2019 मध्ये शिवसेनेने सदाशिव लोखंडे यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी 1,20,195 मतांनी विजय मिळवला. त्यांना 486,820 मते मिळाली होती. त्यांनी काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांचा पराभव केला. कांबळे यांना 3,66,625 मते मिळाली. या दोन्ही वेळेस लोखंडे यांच्या बरोबर मातब्बर नव्हते व मतदारात परिचित नव्हते केवळ मोदी लाटेवर स्वार झाले .

आता मोदी लाट आहे मात्र शिवसेनेची विभागणी झाली . राजकारणाचा ताळेमेळ नाही कोण – कोणाच्या गटाचा समजेना , मतदार मात्र दुष्काळाच्या खाईत लोकांना अनेक समस्यांना तोड दयावे लागत आहे . कोणावर भरोसा ठेवायचा , वाकचौरे , लोखंडेचा प्रचार जोमात मात्र ते स्वत: प्रत्यक्षात दिसत नाही तर वंचित कडून निवडणुक लढविणाऱ्या उत्कर्षा रुपवते मात्र स्वतः चा प्रचार स्वतः करत असल्याचे चित्र दिसत आहे रुपवते ह्या लोकांशी संवाद साधत असल्याने लोकांमध्ये आपुलकी निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे १५ वर्षात विखे – थोरात ज्यांच्यामागे त्यांचा पराभव झाल्याचा इतिहास असल्याने या ही वर्षी चमत्कार घडण्याचे चित्र दिसत आहे .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed