"ताज्या बातम्या, सतत अपडेट्स - आपलं वेबसाईट, आपलं समाचार"
राज्य सरकारने जाहीर केलेला अर्थसंकल्प हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या आकस्मात निधनामुळे अपूर्ण वाटतो आहे. हा अर्थसंकल्प काही बाबींमध्ये चांगला असला तरी उत्तर महाराष्ट्रासाठी अत्यंत निराशादायक आहे. उत्तर महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पामध्ये कोणतीही तरतूद नसल्याची खंत आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केली
युवकांसाठी निराशा जनक अर्थसंकल्प–डॉ.जयश्रीताई थोरात
राज्यामधील अनेक उद्योग बाहेर गेले आहेत. शेतकरी सर्वसामान्य नागरिक अडचणीत आहे. युवकांपुढे बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. असे असताना घोषणा मोठ्या मात्र उत्तर सापडत नसून युवकांसाठी हा अर्थसंकल्प अत्यंत निराशा जनक असल्याची टीका संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केली आहे.