संगमनेर : झुंजार न्यूज
भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रवाद, राष्ट्रीय एकात्मता, सर्व धर्म समभाव आणि मूल्याधिष्ठित राजकारणामुळे भारताची जगामध्ये महासत्तेकडे वाटचाल सुरु असून, देश – महाराष्ट्र राज्य हे सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर असून गावा – गावात , वाडी – वस्तीत , गल्ली – बोलात भाजप अग्रस्थानी असल्याचे मत भाजपा अहमदनगर जिल्हा सरचिटणीस अशोकराव जह्राड पाटील यांनी व्यक्त केले .

भारतीय जनता पार्टीचा दि. 6 एप्रिल 1980 हा स्थापना दिवस असल्याने आश्वी बु ॥ येथील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयात ‘ भाजपादिन ‘ पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकारी समवेत साजरा करत हितचिंतक व जनतेला शुभेच्छा दिल्या .

जह्राड पाटील म्हणाले की , भाजप हा देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्ष असून, संसदेमध्ये 545 पैकी तब्बल 303 खासदार हे भाजपचे आहेत. भाजप हा देशात सर्व भागात घराघरात पोहोचला पक्ष असून, जनतेच्या सेवेसाठी पक्षाचे कार्यकर्ते झटत आहेत. कार्यकर्त्यांच्या बळावर भाजपने देशा सत्ता मिळवले असून, पक्षाला मोठे करण्यामध्ये तळा गाळातील कार्यकर्त्यांचे मोठे योगदान आहे.

भाजप नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या दशकामध्ये देशात प्रगतीचा मोठा टप्पा पार केला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय असे नेते बनले आहेत, सर्व भारतीयांच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. पक्षाचे अध्यक्ष डॉ.जे. पी. नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र गृहमंत्री अमित शाह, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता हा सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी व देश मजबुतीसाठी झटत आहे. पक्षाच्या स्थापनेनिमित्त दि. 6 ते 14 एप्रिल या कालावधीत देशभर सामाजिक न्याय सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून शासनाच्या विविध योजनांची माहिती या साप्ताहात जनतेला दिली जाईल .
