{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

कोपरगांव । झुंजार न्यूज

सालाबादप्रमाणे याही वर्षी कोपरगांव बेट भागातील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी समाधीस्थानावर गुरूपौर्णिमा उत्सव २१ जुलै रोजी पहाटे चार ते दुपारी एक या वेळेत आयोजित करण्यांत आला असून त्यानिमीत्त विविध धार्मीक कार्यक्रम होत असल्याची माहिती श्री संत सदगुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज समाधीस्थान व श्री काशिविश्वनाथ महादेव शैक्षणिक व गोपालन ट्रस्टचे मठाधिपती प. पू. रमेशगिरी महाराज व अध्यक्ष दत्तात्रय बाळकृष्ण होळकर यांनी दिली. 
ते म्हणाले की, सदर दिवशी पहाटे चार वाजता बाबाजींची महापुजा, ५ ते ६ नित्यनियम विधी, सकाळी ७ ते ८ सत्संग व प्रवचन, बाबाजींची षोडशोपचार पुजा ९ ते १०, विविध साधु संतांची प्रवचने व दुपारी बारा वाजता महाप्रसाद होईल. या संपुर्ण कार्यकमाचे पौरोहित्य वेदशास्त्र संपन्न प्रशांत शिखरे (त्रंबकेश्वर), अनंत लावर गुरूजी राहाता, जयप्रकाश पांडे (महादेव मंदिर पुजारी बेट कोपरगांव) हे करणार आहेत. 
या गुरूपौर्णिमा उत्सवासाठी प पू. माधवगिरी, दत्तगिरी, परमानंदगिरी, श्री श्री १००८ महामंडलेश्वर शिवगिरी, संदिपगिरी, संतोषगिरी, भोलेगिरी, शिवभक्त भाउ पाटील, यांच्यासह सर्व संत महंत मोठ्या संख्येने उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत. 
तरी जास्तीत जास्त भाविकांनी या सोहळयासाठी मोठया संख्येने उपस्थित राहुन तन मन धनांने सहकार्य करावे असे आवाहन आश्रमाच्यावतींने उपाध्यक्ष विलास कोते, सचिव अंबादास अंत्रे, विश्वस्थ त्रंबक पाटील, रामकृष्ण कोकाटे, अनिल जाधव, आशुतोष पानगव्हाणे, संदिप चव्हाण, अतुल शिंदे, शिवनाथ शिंदे यांनी केले आहे. 
नगर मनमाड महामार्गावर राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम असुन देश विदेशातील भक्त येथे भेट देवुन दर्शन घेतात पंचधातुपासून जनार्दन स्वामींची सर्वांग सुंदर मुर्ती तयार करण्यांत आली आहे. या सोहळयाची तयारी सुरू झाली असून मंदिर कळसावर विद्युत रोषणाई करण्यांत आली आहे. गुरूपौर्णिमा उत्सवासाठी भाविकांनी तनमनधनाने सहकार्य करावे असे आवाहन करण्यांत आले आहे. महाप्रसादात आमटी भाकरी वाटण्यात येते. २० जुलै रोजी रात्रौ ८ वाजता प पू. रमेशगिरी व शिवभक्त भाउ पाटील यांचे प्रवचन होईल तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *