अकोले । झुंजार न्यूज
आंबेडकरी चळवळीची गाथा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे. त्या चळवळीत ‘माणूस’ हा केंद्रबिंदू मानला गेला. मानवतेची भाषा अन् स्वाभिमानाचं जगणं यासाठी लागणारी ऊर्जा आणि प्रेरणा देण्याचं काम आंबेडकरी चळवळीनं केलं. त्या चळवळ आकाशातील एक लखलखता तारा म्हणजे अकोले तालुक्यातील सुगांव बु॥ या डाव्या व दलित चळवळीच्या विचारधारेचे असणारे विजयराव वाकचौरे हे होय .
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेशी व रिपाई राष्ट्रीय अध्यक्ष तथा केद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील आंबेडकरी , दलित व रिपब्लिकन चळवळीला दिशा प्रदान करण्याचं मौलिक कार्य करणारे आदरणीय विजयराव वाकचौरे यांचा आज 65 वा वाढदिवसा… असून आजचं माजी केद्रीय मंत्री , तथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आदरणीय खा शरदराव पवार , स्व गोपीनाथ मुंडे यांचा ही जन्म म्हणजे 12 डिसेबर हा दिवस भाग्याचाचं म्हणावे लागेल .
आयुष्यभर आंबेडकर चळवळ व आठवले यांच्याशी इमान राखणारा एक सच्चा पाईक म्हणून सर्वांनाच ते सुपरिचित आहेत . महाराष्ट्राच्या आंबेडकरी चळवळीच्या इतिहासात एक पिंपळ पान असून त्यात विजयराव वाकचौरे या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. अर्थात स्पष्ट वक्तेपणा, संघटक, कार्यकर्ता, प्रामाणिक आदी होय .
सामाजिक भान व मूल्यांची जाण असलेले भाऊ हे आंबेडकरी चळवळीतील एक ” स्टॉग मॅन “ ठरले आहेत. जागतिक पातळीवर ज्या चळवळीची नोंद झाली ती भारतातील ‘दलित पँथर चळवळ’ तसेच ‘बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’, ‘रिपब्लिकन चळवळ’, ‘भूमिहीनांची चळवळ’, ‘रिडल्सचा लढा’, ‘मंडल आयोग’, ‘नामांतर आंदोलन’, ‘आंबेडकर भवन’, ‘इंदुमील आंदोलन’, ‘भिमा-कोरेगाव आंदोलन’ इत्यादि मध्ये त्यांनी आपले मौलिक योगदान दिलेले आहे. महाराष्ट्रातील आक्रमक कार्यकर्ता हे कदापी विसरू शकणार नाहीत. आंबेडकर चळवळीसह समाजकारण व राजकारणात कठोरपणे कृतिशील भूमिका बजावत एक नाविन्यपूर्ण ओळख निर्माण त्यांनी केली आहे.
“आम्ही सत्ताधारी होण्यासाठी प्रथमतः सत्ताधारी होण्याची मानसिकता करणे गरजेचे आहे” यासाठी आम्हाला राजकीय भूमिका निश्चित करावी लागणार आहे. ही विचारधारा घेवून आंबेडकरी चळवळीचे ‘ऊर्जा स्त्रोत’ बनले . विजयराव वाकचौरे एक माणूस म्हणून अंतर्बाह्य पारदर्शक आहेत. त्यांचा सहज सरळ स्वभाव, साधी राहणीमान व ध्येयवादी उच्च विचाराने सामाज्यात खूप आदराचे स्थान प्राप्त केले आहे. आज त्यांचा नाबाद 65 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेंच्छा देताना चळवळीच्या माध्यमातून काम करताना राजकिय क्षितिजावर जाण्याचे ध्येय व स्वप्न असल्याने त्यांनी केलेल्या ५० वर्षाच्या अखंड प्रवासातून स्वप्न पूर्ण व्हावे त्यांना होणाऱ्या महायुतीच्या सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळावी ही खरी शुभेंच्छा ठरेल .
राजेंश गायकवाड

