आश्वी । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पानोडी ग्रामपंचायत अंतर्गत हजारवाडी येथे जिल्हापरिषदेच्या निधीतून पाझर तलाव दुरुस्ती व खोलीकरण तसेच भिंतीला कागद आस्तरिकरण या कामाचा सरपंच श्री गणपत हजारे यांच्या हस्ते नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.

या कामामुळे तलावाची गळती थांबून हजारवाडीतील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदर प्रसंगी माजी चेअरमन देवराम हजारे, माजी व्हा.चेअरमन किसनराव हजारे,रभाजी सानप, भाऊसाहेब सानप, बाबासाहेब हजारे, रावसाहेब हजारे, कारभारी हजारे,किसन तबाजी हजारे,भिकु हजारे,येसु हजारे, कैलास सानप, सर्जेराव हजारे मेजर बाळासाहेब हजारे, अनिल हजारे, गंगाराम हजारे आदि उपस्थित होते.

