कल्याण ते मुंबई आ सत्यजीत तांबे यांचा रेल्वेने प्रवास !

मुंबई । झुंजार न्यूज

 

काल दुपारी संगमनेरवरून मुंबईला अधिवेशनास उपस्थित राहण्यासाठी निघालो होतो. या प्रवासात नाशिक-मुंबई हायवेवर भिवंडीमध्ये ट्रॅफिकमध्ये ३-४ तास अडकलो. शेवटी एका मित्राने सल्ला दिला की, कल्याणवरुन लोकल ट्रेनने लवकर पोहोचशील! मग काय, भिवंडी बायपासवरुन कल्याणच्या दिशेने प्रवास सुरु झाला, तेथेही ३० मिनिटांच्या प्रवासाला ३ तास लागले आणि अखेर ट्रेनने मुंबईकडे निघालो.

खरं तर कालच्या या प्रवासानंतर मुंबई महानगर प्राधिकरणाअंतर्गत येणाऱ्या पालघरपासून ते पनवेलपर्यंत आणि कल्याण-डोंबिवलीपासून मुंबईपर्यंतच्या जनतेविषयी प्रचंड आदर वाढलाय! किती सहनशील जनता आहे!

मुंबईच्या अवतीभवती पायाभूत सुविधांचा पुरता बोजवारा उडालाय, माणसाच्या जीवनशैलीची ऐशीतैशी झालीय, पण आपली सहनशीलता अजूनही संपायचे नाव घेत नाही.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *