मुंबई । झुंजार न्यूज
ही गोष्ट आहे एका जिद्दी स्त्रीची जिने नियतीलाही पराभवाची धूळ चारली. जिला जन्मापासूनच अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
समाजाकडून उपेक्षा सहन करावी लागली, लहानपणीच वडिलांनी तिचे लग्न लावून दिले आणि सासरच्या घरात तिचा छळ सुरू झाला.
आयुष्याला कंटाळलेल्या कल्पना यांनी कित्येकवेळा आत्महत्येचाही प्रयत्न केला. पण या सर्वातून सावरत तिने रोज दोन रुपये मजुरीवर काम केले. पण जिद्द आणि चिकाटी कायम ठेवत त्यांनी आज सुमारे एक हजारा कोटींच्या कंपन्यांचे साम्राज्य उभारले.
दुष्काळातून मुंबईच्या झोपडपट्टीत
दुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्रातील ‘विदर्भात’ कल्पना यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती बिकट असल्याने कल्पना शेणाच्या गोवऱ्या बनवून विकायच्या. वयाच्या 12 व्या वर्षी कल्पना यांचा विवाह त्यांच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठ्या असलेल्या व्यक्तीशी झाला.
आणि त्या विदर्भातून मुंबईच्या झोपडपट्टीत पोहोचल्या. त्याचे शिक्षण थांबले. घरातील कामात किरकोळ चूक झाली की कल्पना यांना सासरच्या लोकांकडून रोज मारहाण व्हायची
अंगावर जखमा झाल्या होत्या आणि जगण्याची ताकद संपली होती. एक दिवस या नरकातून पळून गेल्या आणि पुन्हा आपल्या आई-वडिलांचे घर गाठले.
आणि याची शिक्षा कल्पना यांच्यासोबतच त्यांच्या घरच्यांनाही सासरच्या घर सोडण्याची शिक्षा देण्यात आली. गावातील पंचायतीने त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले. यातून कल्पना यांना जीवनाचे सर्व मार्ग बंद झाल्याचे दिसू लागले.

50 हजारांच्या कर्जाने सुरू झाला प्रवास…
कल्पना यांनी दलितांसाठी असलेल्या सरकारी योजनेतून 50 हजारांचे कर्ज घेऊन आपल्या व्यावसायिक प्रवासाला सुरुवात केली. या कर्जातून एक शिलाई मशीन आणि इतर काही वस्तू खरेदी केल्या आणि बुटीक शॉप सुरू केले.
बुटीकचे दुकान रात्रंदिवस चालवत कल्पना यांना त्यांच्या कुटुंबीयांनाही पैसे पाठवायला लागायचे. 22 वर्षांच्या झाल्यानंतर त्यांनी फर्निचरचा व्यवसाय सुरू केला. यानंतर कल्पनाने स्टील फर्निचरच्या व्यावसायिकाशी लग्न केले, परंतु 1989 मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले. आणि पुन्हा एकट्या पडल्या.
यशाकडे कूच
कल्पना यांनी काहीही झाले तरी आपल्या आयुष्यातून गरिबी हटवण्याचे व्रत घेतले. रोज चार ब्लाउज शिवले तर 40 रुपये मिळतील आणि घरच्यांनाही हातभार लागेल, असा विचार त्यांनी केली.
आणि कठोर परिश्रम सुरू केले. दिवसाचे 16-16 तास काम केले, यातून त्यांनी पैसेही कमवले आणि कुटुंबाला आधारही दिला.

बंद पडलेल्या कंपनीला सुगीचे दिवस
2000 च्या दशकात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय देत 17 वर्षांपासून बंद असलेली ‘कमानी ट्युब्स’ नावाची कंपनी
मालकांच्या हातातून काढून घेतली आणि

