आश्वी l झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील डिग्रस येथील आदीवाशी व गोर गरिब समाज्यातील शालेय विदयार्थ्यांना मनसे मुंबादेवी मुंबई व स्वरराज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय दप्तर व वह्या , पेनाचे वाटप करण्यात आले .

स्वतंत्रदिनाचे औचित्य साधून सालाबाद प्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबादेवी विधानसभा व स्वरराज प्रतिष्ठान यांच्या तर्फे नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आदिवासी व गरजू विद्यार्थ्यांना दप्तर वह्या व शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम करण्यात आले . डिग्रस हे गांव दुर्गम भागातील असल्याने येथे मोठया प्रमाणात आदीवासी समाज असल्याने त्याच्या विदयार्थ्यांना शिक्षण घेण्यात कुठली अडचण व कमतरता भासू नये म्हणून एक सामाजिक उपक्रम स्वरराज व मनसे तर्फ राबविला जात असून यांची संकल्पना डॉ दिलीप नागरे यांनी गेल्या १० वर्षापासून सुरु केली आहे . त्याप्रमाणे याही वर्षी आदीवाशी व गोरगरीब विदयार्थ्यांना शालेय दप्तर ‘ वहया , पेनाचे वाटप करण्यात आले

यावेळी डिग्रस गांवचे संरपच अशोकराव खेमनर , मुंबादेवी मनसे तालुका उपसंघटक केशव मुळे , व विभाग अध्यक्ष प्रशांत गांधी उपविभागीय अध्यक्ष अनिल शांताराम नागरे , डॉ दिलीप नागरे , बाळासाहेब नागरे आदीसह कार्यकर्ते व 250 विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Post Views: 741

