आश्वी । झुंजार न्यूज
सतरा हजाराच्या पुस्तकांचा पुरस्कार मी प्रथमच बघत असून संशोधकांच्या संशोधानासाठी संदर्भ ग्रंथांचे मोठे मोल असते. या स्पर्धेत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संशोधन कार्य केलेले संदर्भ ग्रंथ संशोधकांना भेट देण्यात आल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सारखा विचार करणारे भारताचे भावी नेते अशा स्पर्धेतून तयार होतील असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विदयापीठचे सिनेट सदस्य प्रा. डॉ . नितीन तळपाडे यांनी केले .
आश्वी खुर्द येथे भगवान बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त आयोजित राज्यस्तरीय शोध निबंध स्पर्धेच्या सांगता प्रसंगी त्यांनी काढले. देश – विदेशातून शिक्षण घेतलेल्या तीस जिल्ह्यातील संशोधकांनी या खुल्या शोधनिबंध स्पर्धेत भाग घेतला होता.

सुमारे तीन महिन्यापासून सध्याच्या ज्वलंत प्रश्नावर समाजाला दिशा मिळावी या हेतूने संशोधकांची खुली शोध निबंध स्पर्धेचे आयोजिन करण्यात आले होते. लिखाण, सादरीकरण, नाविन्य,संदर्भ यासारख्या विविध टप्प्यावर संशोधकांचा कस लागला.

राज्यस्तरिय शोध निबंध स्पर्धेत इगतपूरीच्या प्रेरणा शेजवळ हिचा प्रथम क्रमांक आला. दुसरा क्रमांक अमरावतीचे प्रज्ञेश बनसोड व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संशोधक दिपक तींगेलवार यांना विभागून देण्यात आला. तर तृतीय क्रमांक अहिल्यानगर जिल्ह्यातील वैष्णवी उंबरकर व ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील अनिल शहाकर यांना घोषित करून प्रदान करण्यात आला.

सुमारे महिनाभर चालणाऱ्या या दिमाखदार सोहळ्याचे उद्घाटन १४ एप्रिल रोजी आश्वीच्या सरपंच अलका गायकवाड यांनी ध्वजारोहण करण्यात आले होते .

आश्वी बु॥ येथील सरुपचंद गांधी मार्केट येथे समितीचे कार्याध्यक्ष डॉ. निलेश मुन्तोडे यांच्यासह परीक्षण समिती प्रमुख प्रा. डॉ.नितीन तळपाडे सदस्य इंजी.आप्पासाहेब गायकवाड व सदस्य जीवन भालेराव यांनी शोध निबंध संशोधन केले .

यावेळी इस्रायल येथून आलेल्या संशोधक मानसी चव्हाण , आरएसपी विभागाचे समादेशक सिंकदर शेख , फ्रान्सिस पाळंदे,प्रज्ञेश बनसोड, प्रेरणा शेजवळ , इंजी.आप्पासाहेब गायकवाड , जीवन भालेराव आदींनी आपले मनोगत व्यक्त केले .

