राहुरी । झुंझार न्यूज

 

अहिल्यानगरकडे येताना राहुरी शनिशिंगणापूर फाट्यावर निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे काही काळ पूर्णतः ठप्प झालेली वाहतूक पाहून डॉ.सुजय विखे पाटील यांनी स्वतः वाहनातून खाली उतरून स्वतः रस्त्यावर उतरून पुढाकार घेत काही वेळातच वाहतूक सुरळीत केली.

 

वाहतूक कोंडी परिस्थितीचा आढावा घेतला. महामार्गावरील अडथळे, सुरू असलेली रस्त्याची कामे आणि अवजड वाहनांची वाढती संख्या यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी प्रत्यक्ष पाहिले.

 

कोंडीत अडकलेल्या प्रवाशांशी संवाद साधत त्यांनी रोजच्या समस्यांची माहिती घेतली. कार्यालयीन वेळेत होणारी विलंब, शाळा–महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना होणारा त्रास, तसेच आपत्कालीन सेवांना अडथळा निर्माण होण्याबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पर्यायी मार्ग नियोजन आणि वाहतूक नियंत्रणाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.

 

नगर मनमाड मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांमुळे वाहतूक व्यवस्थापन ढासळत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी कामाचा वेग वाढवण्याबरोबरच सुरक्षित वळणे, स्पष्ट सूचना फलक आणि अतिरिक्त मनुष्यबळाची गरज अधोरेखित केली. “विकासकामे महत्त्वाची असली तरी नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अडथळा येऊ नये,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *