नगर जिल्ह्यातील अनेक गावांत दुष्काळ
संगमनेर । झुंजार न्यूज
नगर जिल्ह्यात अनेक गावांत यावर्षी कमी पावसामुळे दुष्काळ पडलेला आहे. पण तालुके दुष्काळी जाहीर झाले नसल्याने गावांनाही लाभ मिळणार नाही. अनेक गावे योजनांपासून वंचित राहतील. दुष्काळी भागातील शेतकऱी वंचित राहू नये यासाठी तालुका एवजी गाव हा निकष करावी अशी मागणी माजी आमदार डाॅ. सुधीर तांबे यांनी केली.
या सगळ्या गोष्टीचा विचार करता शासनाकडून शेतकऱ्यांना दुष्काळी योजनांचा लाभ मिळणे गरजेचे असते. शासनाने नुकतेच दुष्काळग्रस्त तालुके जाहीर केले आहेत, मात्र अनेक गावांमध्ये दुष्काळ असूनही तालुका हा निकष असल्याने दुष्काळग्रस्त जाहीर झाला नसलेल्या तालुक्यातील अनेक दुष्काळी गावांना त्याचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मुळात एका तालुक्यामध्ये काही भागात चांगली स्थिती असते, तर काही भागात दुष्काळ असतो. त्यामुळे तालुका निकष दुष्काळ जाहीर करण्याला योग्य नाही. दुष्काळाचा लाभ द्यायचा असेल तर थेट गाव पातळीवरचे निकष महत्त्वाचे आहेत. गाव पातळीवर दुष्काळी निकष ठेवला तर कोणताही शेतकरी किंवा कोणतेही गाव दुष्काळी योजनांपासून वंचित राहणार नाही. त्यामुळे प्रामुख्याने दुष्काळी निकष बदलून ते गाव करावे अशी मागणी ही नाशिक पदवीधर मतदारसंघाचे मा. आमदार डॉ सुधीर तांबे यांनी केली आहे.
