{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

शिर्डी l झुंजार न्यूज

 

 

 

साईबाबा संस्थानच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी आजचा दिवस सोनेरी दिवस ठरलाय. कारण 598 कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

 

 

2000 सालापर्यंतचे 1052 कर्मचारी 2004 साली कायम झाले होते. त्यानंतर तब्बल 20 वर्षानंतर 598 कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याचा निर्णय सरकारने घेतल्यामुळे कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. 598 कर्मचाऱ्यांसोबत 2023 पर्यंत सेवेत 10 वर्ष सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील कायम सेवेत घेतले जाणार आहे. रिक्त जागा तसेच पदोन्नतीची प्रकीया देखील पूर्ण करण्यात येणार असल्याने गणेश उत्सवातच कर्मचाऱ्यांची दिवाळी साजरी होत आहे.

 

 

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. “साईबाबांच्या शिकवणी प्रमाणे आम्ही काम करत गेलो. साईबाबांच्या आशीर्वादाने हा ऐतिहासिक निर्णय आम्हाला करता आला. कोण टीका करतंय, कोण गैरसमज पसरवतंय यात आम्ही वेळ घातला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने चालना दिली ते उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच संस्थानची समिती आणि अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन”, अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी दिली.

उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर विखे पाटील काय म्हणाले?
राधाकृष्ण विखे पाटील यांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिर्डी दौऱ्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भूमिका मांडली. “प्रत्येक पक्षाच्या नेत्याला सभा घेण हे कामच आहे. ते शिर्डीत आले तर नवीन काय होणार आहे? त्याची खूप चर्चा करण्याची आवश्यकता नाही”, अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed