संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेरला विधानसभा निवडणुका संपल्यानंतर शहर अशांत करण्याचे काही जण काम करत आहे अशांचा शोध घेऊन त्यांना वेळीच रोखा तसेच दोन समाजात जातीय तेढ निर्माण करून त्याला चुकी च्या पद्धतीने खतपाणी घालून काहीजण त्या घटनांना राजकीय वळण देत दंगली घडविण्याचा प्रयत्न सुरू आहे अशांना जर पोलीस प्रशासन पाठीशी घालत असेल तर संघर्ष करण्यासाठी पहिल्यांदा तुमचा आमदार उपस्थित राहील
या हल्या प्रकरणी जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर गंभीर स्वरूपाची कलमे लावून तात्काळ गुन्हे दाखल करावे अन सर्व हल्लेखोरांना अटक करत त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करावी अशी सक्त ताकीद आ अमोल खताळ यांनी पोलीस प्रशासनाला दिली आहे

